ऑनलाईन टीम / नोम पेन्ह :
भारतात तयार करण्यात आलेल्या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर अनेक देशांनी भारताकडे कोविड लसीची मागणी केली आहे. नुकतीच कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनीही भारताला कोरोना लस पाठवण्याचे आवाहन केले आहे. कंबोडियन मीडिया रिपोर्टद्वारे एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
चीनने कंबोडियाला यापूर्वी 10 लाख लसीचे डोस पाठवले आहेत. त्यानंतर कंबोडियाने भारताकडे लसीची मागणी केली आहे. नेपाळ, भूतान, मालदीव, म्यानमार, बांगलादेश, ब्राझील, श्रीलंका, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मोरोक्को, सौदी अरेबिया आणि मंगोलिया या देशांनीही यापूर्वी भारताकडे लसीची मागणी केली आहे.