सांबरा : कचऱयाची उचल करण्याकडे सांबरा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ऐन पावसाळय़ात ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळाले आहे.
सध्या पावसाळा सुरू असून मेन रोड, एअरपोर्ट रोडसह काही ठिकाणी कचऱयाचे ढीग साचले आहेत. कचऱयाची वेळीच उचल करण्यात येत नसल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने गावातील कचऱयाची उचल करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.