शहरातील कोपऱयांवर कचऱयाचे ढिगारे : स्वच्छता राखण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात दिवाळी सण मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वत्र चार दिवस फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले. मात्र सण संपताच शहरातील विविध कोपऱयांवर कचऱयाचे ढिगारे दिसत असून, आरटीओ कार्यालयाजवळील कचऱयाची उचल झाली नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
दिवाळीनिमित्त सर्वत्र स्वच्छता करून रंगरांगोळी घालण्यात आली होती. मात्र घातलेली रांगोळी अद्याप हटली नाही. पण शहरातील गल्लीच्या कोपऱयात कचऱयाचे ढिगारे साचू लागले आहेत.
कचऱयाची उचल नियमितपणे केली जाते असे महापालिकेकडून सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात कचऱयाची उचल करण्यात येत नसल्याने कचरा साचून आहे. दिवाळीमुळे फुलांची सजावट तसेच पुजेसाठी उसाचा वापर केला जातो. सध्या कचराकुंडीत फुलांच्या माळा आणि उसाचा कचरा मोठय़ा प्रमाणात साचला असून, याची उचल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. परिणामी कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. आरटीओ चौकात कचऱयाचा ढीगारा साचला असून उचल करण्याकडे मनपा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केले आहे.
हा परिसर कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या हद्दीवर येतो. त्यामुळे येथील कचऱयाची उचल लवकर केली जात नाही. हद्दीच्या वादामुळे हा परिसर कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे येथील कचऱयाची उचल तातडीने करून परिसर स्वच्छ बनवावा, अशी मागणी होत आहे.