किमान तापमान 16 तर कमाल 33 अंशांवर
प्रतिनिधी/ बेळगाव
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱया बेळगावात सध्या उष्णता काहूर माजवू लागली आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण होऊ लागली आहे. सर्वसामान्यांच्या अंगाची काहिली होऊ लागली असून सध्या उष्णतेचा पारा 33 अंशांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारीच्या अखेरलाच ही परिस्थिती निर्माण झाली असून मेपर्यंत यावषी उष्णता अधिक वाढण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर आता उष्म्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे विविध आजार डोके वर काढण्याची शक्मयता निर्माण होत आहे.
गेल्या महिन्यात कडाक्मयाची थंडी होती. आता फेब्रुवारीच्या मध्यावधीपासूनच उष्म्यामध्ये वाढ होत आहे. शेवटच्या आठवडय़ात तर उष्म्यामध्ये अधिकच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेळगाव शहराच्या तापमानात वारंवार बदल होताना दिसत आहे. जोरदार पाऊस, त्यानंतर कडाक्मयाची थंडी आणि कडकडीत उन्हाळा, यामुळे आजारांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
बेळगावचे सध्याचे तापमान किमान 16 तर कमाल 33 अंशांवर पोहोचले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तापमानात म्हणावी तितकी वाढ नव्हती. थंडी आणि धुके पडत होते. मात्र, आता अचानक उष्म्यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात उष्म्याचा तडाखा वाढणार असे दिसून येत आहे. दिवसा ऊन असले तरी पहाटेच्या वेळी थंडी पडत आहे. यामुळे नागरिक निवांत झोप घेऊ शकत आहेत. मात्र, आता उष्णता वाढत राहिल्यास झोप मिळणे कठीण होणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे फॅन, एसी यांचा वापर करावा लागत आहे.
ग्रामीण भागात तर गंभीर परिस्थिती
वाढत्या उष्म्यामुळे डासांचे प्रमाणदेखील वाढणार आहे. डास आणि उष्णता यातून सुटका करून घेण्यासाठी शहरी भागात फॅनची गरज भासू लागली आहे. कचऱयाची वेळेत उचल होत नाही, गटारी साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गटारी स्वच्छ करण्याकडे ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. यातच काही गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे यावषीचा उन्हाळा सर्वांनाच मोठय़ा कष्टाचा ठरणार आहे.