प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या प्रशासनावर नसलेल्या पकडीमुळे कडेगाव शहरातील पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्यात शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद आहे. ऐन उन्हाळ्यात नगरपंचायतीच्या दशलक्ष विहिरीतून होणारा नळ पाणी पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे जवळजवळ निम्म्या शहरातील लोकांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात, कोरोना सारख्या जीवघेण्या संकटात संचारबंदी असतानाही भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रांताधिकारी गणेश मरकड साहेब यांना सोमवारी भेटून आंदोलना बाबतीत परवानगी घेण्यासाठी भेटणार आहे. अशी माहिती डि.एस.देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. येथील विहिरीतील इलेक्ट्रीक मोटारीमध्ये बिघाड झाला आहे. ती दुरुस्त करण्यासाठी आपल्या शहरांतील कर्तव्यदक्ष असलेल्या सन्माननिय मुख्याधिकाऱ्यांना वेळ नाही.
त्यामुळे लोकांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात, कोरोना सारख्या जीवघेण्या संकटात संचारबंदी असतानाही भटकंती करण्याची वेळ आली आहे. यावेळी नकळतपणे काही वेळेस सोशल डिस्सिंटसिंगचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याला कोण जबाबदार पाणी पुरवठा विहिरीतील मोटारीमध्ये बिघाड निर्माण झाल्यास पाणी पुरवठा बंद होवू नये व लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये. यासाठी येथे एक मोटार कायम स्वरुपी राखीव ठेवणे आवश्यकता असताना तसे होताना दिसत नाही. यामुळे सर्व सामान्य नागरिक गावाशेजारील विहरीवर पाणी आणण्यासाठी जात आहे.तेथे गर्दी होत आहे. सध्या कोरोना ची साथ आहे. शासनाच्या धोरणाचा फज्जा उडत आहे. त्यास मुख्याधिकारी जबाबदार आहे. केवळ खरेदी करणे, ठेकेदार यांची बिले .