कडेगाव/प्रतिनिधी
नेर्ली (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज पहाटे साडे बाराच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर त्यांच्या २८ वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आंबेगाव (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या ३६ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीची १२ वर्षीय मुलगी व ९ वर्षीय मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.तर त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
आज पहाटे तालुक्यातील एकूण तीन जणांना कोरोनाची लागण झाली तर कोरोनाने तालुक्यात दुसरा बळी गेल्याने सर्वत्र प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून तालुका अक्षरशः हादरुन गेला आहे. तर सोहोली (ता.कडेगाव) येथील ५५ वर्षीय व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नेर्ली येथील ५७ वर्षीय व्यक्ती पत्नी व मुलगा व मुलगी अशी एकूण चौघेजण सोमवारी मुंबई येथून नेर्ली (ता.कडेगाव) येथे आपल्या मूळगावी आले होते.त्यांना आरोग्य विभागाने त्यांच्या घरी होम क्वारंटाईन केले होते. यापैकी ५७ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले.तेथे त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतलले असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर तालुका आरोग्य विभागाने त्यांची पत्नी व मुलगीला कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले.दरम्यान कोरिना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या २८ वर्षीय मुलासही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान आज पहाटे साडे बाराच्या सुमारास नेर्ली येथील ५७ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा उपचार सुरु असतानाच मुत्यू झाला आहे. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्राससिंह देशमुख, सभापती मंगल क्षिरसागर यांनी नेलीँ गावाला भेट देवून गावातील नागरीकांनी काळजी घेण्याचे अवाहन केले.