प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगीसह तालुक्यातील अनेक गावात टेंभू योजनेचे पाणी अद्याप पोहचले नाही. टेंभू योजनेचे पाणी पुर्ण क्षमतेने सुरू नसल्याने पाणी शिवाजीनगर व हिंगणगाव परिसरातील ऊस आणि इतर पिके वाळून चाललेली आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातच पहिले आर्वतन होत असलेले टेंभू योजनेचे पाणी जानेवारी महिन्याचा शेवट आला तरी अजून सुटलेले नसल्याने तालुक्यातील असंख्य गावातील पिके वाळून चाललेली आहेत.
टेंभू योजनेचे पाणी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातच सुटत असते मात्र यावर्षी जानेवारी संपत येत आहे तरी पाणी सोडलेले नाही. यावर्षी टेंभू योजनेचे पाण्याबाबतीत माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांनी टेंभूच्या पाण्याच्या बाबतीत लक्ष न दिल्याने पाण्याची बोंबाबोंब झाली आहे.