वार्ताहर /कडोली
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी लक्ष घालून सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा आणि मराठी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारी सुमारे 500 पत्रे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कडोली गावातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती करणारी पत्रे कडोली गावातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली आहेत.