कोरोनामुक्तीसाठी केली देवाकडे प्रार्थना
वार्ताहर / कडोली
मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक जण कोरोनाच्या विळख्यात मृत्युमुखी पडले आहेत. हा सारा कठीण काळ जावून पूर्ववत सारे काही व्हावे आणि कोरोनाचा संसर्ग देशातून नाहीसा व्हावा, असे साकडे घालत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत कडोली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात
आला.
कडोली येथील ग्राम पंचायतीसमोर असणाऱया मंदिरात भक्तांनी देवाकडेही हाक मारली. कोरोनामुळे संपूर्ण जगालाच हादरला बसला आहे. हे जग कोरोनामुक्त होवो हीच ईश्वरचणी प्रार्थना असून देवाने यातून सर्वांना तारावे, असे साकडे देवाकडे घालण्यात आले.
कडोली येथील श्री कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्यावतीने सुरक्षित अंतर ठेवून व कोरोनाचे नियम पाळून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा सहावा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.