कणकवली / प्रतिनिधी-
सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंचांनी केलेल्या कार्याला तोड नाही. सरपंचांना भाजपच्या माध्यमातून विमा कवच देण्याचा आमदार नीतेश राणेंचा उपक्रम महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे. या उपक्रमाचे अनुकरण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी करतील, अशी मला आशा आहे. तसेच नारायण राणे हे परिस्थितीला आव्हान देऊन त्यावर मात करणारे नेतृत्व आहे. आपल्या वाडिलांचा हा आदर्शगुण घेऊन नीतेश राणे आपल्या मतदारसंघात जनतेची सेवा करीत आहेत. जनतेला दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून नीतेश राणेंची महाराष्ट्रात ओळख असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
भाजपा व आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा पाॅलिसी वितरण करण्याचा कार्यक्रम कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोाजजत केला होता. या कार्यक्रमप्रसंगी श्री. फडणवीस यांनी सरपंचांशी आनलाईन संवाद साधला. यावेळी आमदार नीतेश राणे, जि.प.अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, वैभवाडीचे सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवींद्र पाळेकर, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या, नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष सर्वश्री संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संतोष किंजवडेकर, डा. अमोल तेली, सरपंच संघटना अध्यक्ष संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कोकणावर निसर्ग, तौक्ते वादळ व जलप्रयलाची संकटे आली या संकटकाळात भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जनसेवेचे व्रत घेऊन संकटग्रस्तांना मदतीचा आधार दिल्याने ते संकटातून सावरले. नीतेश राणे म्हणाले, कोरोनााजवरुद्धच्या लढाईत ठाकरे सरकारकडून सरपंचांचा वापर केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करून कोरोना योद्धयांचे कौतुक करतात. पण त्यांच्या सुरक्षितेतेची हमी घेत नाहीत. जिल्ह्यातील सरपंचांना विमा कवच देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या आवेशात केली.परंतु अद्यापही त्यांच्याकडून त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांनी पोकळ घोषणा करू नये. तसेच सरपंचांना विमा कवच देण्याचे सरकारला जमले नाही, पण भाजपने ते करून दाखवले, असे त्यांनी सांगितले.