प्रतिनिधी / कणकवली
कोरोना ची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू होणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नगरपंचायत पदाधिकारी, शहरातील काही व्यापारी, आणि विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जनता कर्फ्यू कालावधीत शहरात येणारे सर्व रस्ते बंद राहणार आहेत. तसेच बँक, दूध भाजीपाला आदींची विक्री देखील बंद राहणार.
येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात जनता कर्फ्यू च्या अनुषंगाने बैठक झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, व्यापारी मंदार आळवे, राजन पारकर, नंदू उबाळे, दत्ता शंकरदास सुजित जाधव, गीतांजली कामत आदी उपस्थित होते. कणकवली शहरात सध्या 225 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत या खेळीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यातआला.