गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामिजी यांच्या मार्गदर्शनाखाली कणेरी (तालुका करवीर) येथे शनिवारी रात्री 25 हजार गोमय दिवे लावून गावांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या नावाचा यावेळी दीप लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संपूर्ण प्रदूषण मुक्त असा हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये हे असलेले दिवे हे पूर्ण गायीच्या शेणापासून तयार केलेले दिवे होते. यापासून मिळणारी ऊर्जा व येणारा धूर हा पूर्णता प्रदूषण मुक्त व शुद्ध हवा करणारा असा हा दूर असल्याने पर्यावरणाला साथ देनारा हा महोत्सव असल्याचे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी सांगितले.
कणेरी गावामध्ये सर्व ग्रामस्थ, कणेरी मठ येथील गुरुकुल चे विद्यार्थी, गावातील तरुण मंडळी गावातील महिला व लहान मुले सर्वांनी मिळून संपूर्ण गावांमध्ये पंचवीस हजार गोमय दिवे लावून यावेळची दीपावलीचा दिपोत्सव आगळ्यावेगळ्या प्रमाणात साजरा केला. गावातील नागरिकांना प्रथमच असा उत्सव होत असल्याने मोठी उत्सुकता होती. ज्या वेळेला महोत्सवास सुरुवात झाली त्या वेळी ग्रामस्थांच्या बरोबरच संपूर्ण गाव दीपोत्सवाने उजळून निघाले होते.
या दिव्यांना सुगंधाची जोड होती. या धुरामुळे नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. हे दिवे पूर्ण इको फ्रेंडली असून याचा भस्म शुद्धीकरणासाठी पाण्यामध्ये व शेतीमध्ये, कुंड्यांमध्ये वापरून याचा खत म्हणून सुद्धा वापर होतो. हे दिवे जवळपास 15 ते 20 मिनिटे जळतात.