प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
कणेरी ता. करवीर येथे तीन गवारेडे दिसल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज संध्याकाळी सहा वाजता हे गवारेडे नागरिकांना दिसले. सहाच्या सुमारास हे गवारेडे कंदलगाव मार्गे डोंगरातून आले. असून येथील गंगा कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या शेतीमध्ये हे गवारेडे नागरिकांना दिसल्यानंतर यावेळी येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी त्यांना बघून आरडाओरड केल्यानंतर हे गवारेडे येथील शेतकरी वसंत गवळी यांच्या ऊसात शेतात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुमारास गेले असून अद्यापि बाहेर नाल्याने कनेरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दोन गवारेड्यांनी धुमाकूळ घातला होता व रात्रीनंतर ते पसार झाले होते. परत दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी आज हे गवे आल्याने पुन्हा एकदा शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. अजून वन अधिकारी अथवा गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये आणखीनच भिती पसरलीय. वेळीच गव्यांचा बंदोबस्त होण्यासाठी नागरिक प्रशासकीय यंत्रणेची वाट पाहत आहेत.