उद्या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन : देवस्थान ट्रस्टकडून धार्मिक-संस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक बांधिलकीचीही जपणूक
प्रतिनिधी /बेळगाव
दक्षिण काशी समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव विशेष भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त…..
बेळगाव ही मंदिरांची भूमी आहे. त्यातही दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिराचा महिमा अगाध आहे. 2 हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून भगवंताचा पाचवा अवतार मानला जाणाऱया कपिल मुनींनी स्वयंभू मूर्तीने हे मंदिर स्थापन केले आहे.
या ठिकाणी केवळ शंकराचेच नव्हे तर गणपती, कालभैरव, वीरभद्र, दत्त, विष्णू, मारुती, कार्तिक स्वामी, नवग्रह, साई आणि नागदेवता यांचीही मंदिरे आहेत. शमी, कडूलिंब, औदुंबर, वड, पिंपळ असे पाच वृक्ष एकत्र असणारी दुर्मीळ अशी पंचवटी येथे आहे. कैलासावर मिळणारी ऊर्जा किंवा चैतन्य लहरी कपिलेश्वर मंदिरातही मिळतात हे वैज्ञानिकदृष्टय़ा सप्रमाण सिद्ध झाले आहे.
अलीकडच्या काळात नूतन कार्यकारिणीने मंदिरामध्ये अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मुख्य म्हणजे मंदिराच्या स्वच्छतेवर प्राधान्याने भर देण्यात आला आहे. मंदिर परिसरात अभिषेक केलेले पाणी व दूध भक्तांच्या पायामध्ये येत असल्याचे पाहून 120 फुटाची पाईप लाईन घालून हे पाणी कपिलतीर्थ तलावामध्ये वर्ग करण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर परिसरात
ग्रॅनाईटची फरशी बसविण्यात आली असून दर्शनी भागाची मार्बल फरशी काढून मंदिराला पुरातन स्वरुप देण्यात आले आहे. मंदिरामध्ये अक्षता किंवा तांदूळ अर्पण करण्याबाबत जनजागृती करून पातेले ठेवून यामध्ये तांदूळ संकलित केले जातात आणि दर सोमवारी त्याचा वापर करून प्रसाद वाटप केले जाते. मंदिरामध्ये नागदेवतांच्या अनेक भग्न प्रतिमा होत्या. त्यांचे विधिवत विसर्जन करून त्या ठिकाणी अष्टकुल नागदेवतेचे मंदिर व बाजूला कार्तिकस्वामींचे मंदिर दगडी स्वरुपात बांधण्यात आले.
मंदिराच्या बाजूला असणाऱया खुल्या जागेचा सदुपयोग करून घेऊन तेथे तीन मजली इमारत बांधण्यात आली आणि येथे शंकराचे जीवन चरित्र शिल्प स्वरुपात मांडण्यात आले. ध्यान धारणा करण्यासाठी गोमय आणि माती एकत्रित करून जमीन तयार करण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर बालसंस्कार शिबिर घेतले जाते. तसेच तरुणांना मल्लखांबासह शारीरिक कसरतीचे धडे दिले जातात.
सैन्य भरतीसाठी येणाऱया युवकांसाठी मोफत निवास-भोजन सोय
महत्त्वाचा उपक्रम म्हणजे तिसऱया मजल्यावर असणाऱया भक्त निवासामध्ये सैनिक भरतीसाठी येणाऱया युवकांसाठी मोफत निवास व भोजन सोय केली जाते. आजपर्यंत 268 जणांनी याचा लाभ घेतला आहे. मंदिर केवळ पूजाअर्चा यावरच भर देत नसून सांस्कृतिक देवाण-घेवाणही करते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 2020 मध्ये आकर्षक असा लेझर शो आयोजित करण्यात आला. तर 2021 मध्ये शहर आणि तालुक्मयातील समस्त वारकरी संप्रदायाला एकत्र आणून ‘गजर टाळ-मृदंगाचा’ हा कार्यक्रम यशस्वी केला.श्रावण महिन्यात विविध प्रकारचे देखावे केले जातात तर दर सोमवारी विशेष आरास केली जाते. मंदिराने धार्मिक आणि संस्कृतिक कार्यक्रम करतानाच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. 2019 मध्ये महापूर आल्यावेळी देवस्थान ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरात बोटीच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले व त्यांच्या भोजनाची सोयही केली.
देवस्थानकडून मदतीचा हात
बेळगाव तालुक्मयातील आंबेवाडी गावात तसेच शहरात आग लागल्याने जी कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्यांना देवस्थानने मदतीचा हात देऊन जीवनावश्यक साहित्य दिले. कोरोना काळात मंदिरातर्फे खास रुग्णवाहिकेची सोय करून डायलेसीस, हृदयविकार, पक्षाघात व गर्भवती स्त्रिया यांची विनामूल्य ने-आण करून त्यांना दिलासा दिला. शिवाय पत्रकारांसाठी विशेष असे
जॅकेटही दिले.
अनेक मान्यवर मंडळींची भेट
मंदिरामध्ये अग्निहोत्र विधी केला जातो. शिवाय भाविकांची मागणी लक्षात घेऊन कालसर्प शांती विधिवत केली जाते. या मंदिराला केदारनाथ, सोमनाथ येथील पुजारी तसेच अनेक मान्यवर मंडळींनी भेट दिली आहे. बेळगावकर व भाविक यांची मंदिरावरील श्रद्धा ही कार्यकारिणीला आणि सेवेकऱयांना काम करण्यासाठी बळ देते. यापूर्वीच्या अध्यक्षांनी तसेच सर्वांच्या सहकार्यामुळेच हे कार्य होत असल्याची भावना विद्यमान पदाधिकाऱयांनी व्यक्त केली.