रेल्वेमार्गाच्या दुतर्फा बांधण्यात येत आहे भिंत, येण्या-जाण्याचा मार्ग बंद होण्याची शक्मयता
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे विभागाने कपिलेश्वर रोडवरील रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंना भिंती घालण्याचे काम सुरू केले आहे. या भिंतींमुळे या भागातील रहिवाशांना रेल्वेमार्गाच्या दुसऱया बाजूला येणे-जाणे कठीण होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. येण्या-जाण्यास जागा ठेवूनच बांधकाम करा. अन्यथा, बांधकाम बंद पाडण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
नागरिकांना विश्वासात न घेता काही वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले. यामुळे या परिसरातील व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. उड्डाणपुलाच्या बाजूने रस्ता करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी लोकप्रतिनिधींनी दिले होते. परंतु उड्डाणपूल झाल्यापासून कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच आता रेल्वे विभागाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंना काँक्रिटच्या भिंती घालण्याचे काम सुरू केले आहे. विरोध करूनही काम सुरू ठेवण्यात आल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. रस्ता बंद केल्यास नागरिकांना उड्डाणपुलावरून फिरून जावे लागणार आहे. त्यामुळे येण्या-जाण्यास तरी वाट उपलब्ध करून देण्याची मागणी तांगडी गल्ली, भांदूर गल्ली, रामा मेस्त्राr अड्डा, कपिलेश्वर रोड, ताशिलदार गल्ली येथील नागरिकांमधून होत आहे.
यावेळी अनुराधा सुतार, लिला हिशोबकर, कल्पना होसूरकर, स्मिता कोलेकर, विजया देसाई, सुमन चव्हाण, सुशिलाबाई नाईक, विजया भोसले, सुरेखा पन्हाळकर, सुशिला टेपुगडे, सीमा पोटे, इंदू शिंदे, सीमा पाटुकले, सुमन चव्हाण, आय. जी. मुचंडी, कपिल भोसले, वसंत परमाज, अभिनंदन परमाज, राजन कालकुंद्री, अशोक जाधव, सचिन सुर्वे, श्रीधर देसाई, वैभव मण्णुरकर, महेश लगाडे, संजय नाईक संजय कालकुंद्री यांच्यासह मोठय़ा संख्येने रहिवासी उपस्थित होते.
येण्या-जाण्यास जागा ठेवावी : अनुराधा सुतार
रेल्वे विभागाने हा रस्ता बंद केल्यास वयोवृद्ध, महिलांना त्याचा त्रास होणार आहे. भिंत बांधण्याला आमचा विरोध नाही, परंतु येण्या-जाण्यास जागा ठेऊन त्यांनी बांधकाम करावे. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.
संपर्क झाला कमी : विजया देसाई
रेल्वे ओव्हरब्रिजमुळे आधीच आमचा संपर्क कमी झाला असताना आता ही भिंत घालण्यात येत आहे. यामुळे महिलांना बाजारात जाण्यासाठी, मुलांना शाळेत जाण्यासाठी अडथळे निर्माण होणार असल्याने रेल्वे विभागाने याचा विचार करण्याची मागणी त्यांनी केली.
पर्यायी मार्ग उपलब्ध करा : अभिनंदन परमाज
पर्यायी मार्ग देऊन नंतरच रेल्वे विभागाने या भिंतींचे बांधकाम करावे. उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे पादचाऱयांना येणे-जाणे शक्मय नसल्याने कपिलेश्वर रोडवरून पादचारी ये-जा करतात. परंतु भिंती घातल्यास हा मार्गच बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम बंद करा : आय. जी. मुचंडी
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता सोडतो असे सांगणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गायब आहेत. त्यातच आता रहिवाशांना विश्वासात न घेता तातडीने बांधकाम उरकण्यात येत आहे. त्याला आमचा विरोध असून जोवर येण्या-जाण्यास मार्ग ठेवण्यात येणार नाही, तोवर बांधकाम बंद करण्याची मागणी त्यांनी केली.