वार्ताहर / कबनूर
सर्वसामान्यांना न्याय कसा देता येईल ही भूमिका घेत आहोत. कबनू रातील अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व महाविकास आघाडीच्याकडून प्रलंबित प्रश्नावर लक्ष देऊन लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे मत पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले.
कबनूर येथे राष्ट्रीय काँग्रेस कार्यालय उद्घाटन प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील होते. तर जयकुमार कोले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, संचालक प्रमोद पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य प्रमोद पाटील उपस्थित होते.
गावातील युवकांच्या उत्साहाने मी भारावून गेलो आहे असे पाटील म्हणाले, सर्वसामान्य यांचं महाविकासआघाडी हे सरकार आपलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून व खंजिरे बावस्कर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केले जाईल प्रसंगी मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक उदय गीते यांनी केले तत्पूर्वी नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. पीएम पाटील, जयकुमार कोले, बी. राहुल खंदारे यांची भाषणे झाली. यावेळी इनाम जमीन कचरा समस्या याबाबतच्या समस्या नामदार पाटील यांच्यासमोर मांडल्या. गावातील पाणी व कामगारांच्या समस्या बाबत रियाजची कोडे यांनी मांडले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. नामदार पाटील हे पहिल्यांदाच कबनूर मधील मुख्य चौकात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नामदार पाटील यांनी प्रसिद्ध दैवत दर्ग्यात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. चौकातील रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अर्धपुतळ्याचे पुष्पहार अर्पण केले. मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सूत्रसंचालन रियाज चिकोडे यांनी केले तर आभार तोफिक पटेल यांनी मानले.