प्रतिनिधी / इचलकरंजी
कबनूर येथील जयगोंडा मळ्यात भाड्याच्या घरात राहत असलेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. अस्मा साहिल कलावंत (वय २२) असे तिचे नाव आहे. याची नोंद पोलिसात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
साहिल कलावंत या युवकाचा ६ महिन्यांपूर्वी मृत अस्मा बरोबर विवाह झाला होता. या नवविवाहितीने आज दुपारी राहत्या घराच्या बेडरूममधील वास्याला ओढणीने गळफास लावून घेतली. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे.