ऑनलाईन टीम / टोकियो :
भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम प्रवेश केला आहे. अंतिम पात्रता फेरीच्या तिन्ही प्रयत्नांमध्ये तिने 60 मीटरच्या वरची कामगिरी केली. पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर तर तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर थाळीफेक करत ती दोन्ही ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली असून, तिची अंतिम फेरी 2 ऑगस्टला होणार आहे.
अंतिम फेरीत कमलप्रीतने चांगली कामगिरी केल्यास भारताला आणखी एक पदक मिळणे निश्चित आहे.