नवी दिल्ली/प्रतिनिधी
सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi President of Indian National Congress) परदेशी असण्याच्या मुद्द्याला निरर्थक ठरवत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Union Minister) यांनी त्यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “जर कमला हॅरिस (Kamala HarrisVice President of the United States) अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी, भारताच्या नागरिक, राजीव गांधी (माजी पंतप्रधान) (Rajiv GandhiFormer Prime Minister of India) यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या, पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?” असा सवालही रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच आठवले यांनी सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवे होते आणि जर त्या हे पद स्वीकारणार नव्हत्या, तर काँग्रेसला (Congress) बळकटी देण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवे होते असेही रामदास आठवले म्हणाले.
जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या तर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधीं २००४ च्या निवडणुकांनंतर भारताच्या पंतप्रधानही बनू शकल्या असत्या असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी मेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेत यांच्यासोबत बैठकही घेतली होती. याभेटीनंतर मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे.
“जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीला (UPA) २००४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता,” असे आठवलेंनी इंदोर येथे पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.