ग्रामस्थांनी उघडकीस आणला प्रकार, मात्र वनखात्याकडून सतावणूक होत असल्याचा आरोप.
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील कंरझोळ रानामध्ये बेकायदेशीररित्या अज्ञात इसमांनी सागवानी झाडांची कत्तल केली असून यासंदर्भात प्रकार स्थानिक भागातील नागरिकांनी उघडकीस आल्यानंतर वनखात्याची यंत्रणा चौकशीसाठी गावातील नागरिकांची सतावणूक करीत असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेने केलेला आहे. सदर प्रकार हा दुर्दैवी स्वरूपाचा असून या प्रकरणी गुंतलेल्या संशयितावर सखोल तपास करून कारवाई करावी अशा प्रकारची मागणी भूमिपुत्र संघटनेने केलेली आहे.
निसर्गाची बेकायदेशीर हानी भूमिपुत्र संघटना सहन करणार नसून पर्यावरण व निसर्ग हे आमच्या जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे बेकायदेशीररित्या सागवानी झाडांची कत्तल करून गावातील ग्रामस्था?ची बदनामी करण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नाही .मात्र वनखात्याची यंत्रणा जर अकारणास्तव नागरिकांची सतावणूक करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा भूमिपुत्र संघटनेने दिलेला आहे. वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेने एकूण झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तरपणे माहिती पत्रकारांना दिली.
सागवानी झांडाची कत्तल झाल्याचे उघडकीस.
दरम्यान यासंदर्भात माहिती देताना अर्जुन गावडे त्यांनी सांगितले की 19 फेब्रुवारी रोजी लक्ष्मण बोर्डेकर यांच्या घरापासून जवळपास पाचशे मीटर अंतरावर सागवानी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर यासंदर्भातली माहिती याभागातील अभयारण्याच्या अधिकाऱयांना सकाळी 7.30 वाजता देण्यात आली होती. मात्र त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही .दुपारी 12.30 वाजता सदर अधिकारी मंडळी येऊन यासंदर्भात पाहणी केली व रात्री लक्ष्मण बोर्डैकर यांना झोपेतून उठवत चौकशीसाठी नेले व त्यांच्यावर या चौकशीसाठी दबाव आणण्यात आला. लक्ष्मण बोर्डेकर यांची जमीन असलीतरी या संदर्भात प्रकार आपल्याला अज्ञात असल्याचे लक्ष्ममण
बोर्डेकर यांनी वनखात्याचे अधिकाऱयांना सांगितले मात्र त्यांच्यावर दबाव घालून त्यांच्याकडून गुन्हा कबुल करण्यासाठी या भागाचे अधिकारी प्रयत्न करीत असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेने केलेला आहे. सकाळी यासंदर्भातील माहिती देऊन सुद्धा दुपारपर्यंत अभयारण्याची अधिकारी झोपले होते की हेतुपुरस्सरपणे असल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात यामुळे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे..
ग्रामस्थानी प्रकार उघडकीस आणला तरीसुद्धा.
दरम्यान सागवानी लाकडाची कत्तल झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर यासंदर्भात माहिती खुद्द ग्रामस्था?नी अधिकाऱयांना दिली. त्यांना स्थानिक नागरिक सहकार्य करीत असतानासुद्धा त्यांची मदत घेण्याऐवजी त्यांना धमकावून गुन्हा कबूल करण्यासाठी प्रयत्न करणे हे खरोखरच दूरगामी स्वरूपाचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे .लक्ष्मण बोडेकर हे सर्वसामान्य कुटुंबातील असून ते आपला व्यवसाय दुधाच्या उत्पन्नावर चालवितात. त्यांच्या जमिनी मधील सागवानी झाडे तोडली असली हे खरे असले तरी त्यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही असे असताना त्यांच्यावर दबाव घालून गुन्हा कबूल करण्यासाठी लावणे हे खरोखरच निषेधार्थ असल्याचे संघटनेचे पदाधिकारी आंतानियो पिं?टो यांनी स्पष्ट केले .ही सतावणूक थांबवा अन्यथा पुन्हा एकदा अभयारण्याच्या अधिकाऱयांच्या विरोधात गावामध्ये उठाव करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
पर्यावरणाची हानी होवू देणार नाही.
यावेळी बोलताना शिवाजी झर्मेकर यांनी सांगितले की पर्यावरणाची हानी कदापि होऊ देणार नाही. गावातील भागांमध्ये बेकायदेशीर कत्तल होऊ नये यासाठी देवळामध्ये गांऱयाणे घातलेले आहे. असे असताना आमची मंडळी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणार नाही. मात्र दुसऱया गावातील लोक याठिकाणी येऊन बेकायदेशीर कत्तल करून पर्यावरणाला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला गावातील नागरिकडाडून विरोध करीत आहेत. त्याचबरोबर सरकारने या प्रकरणाच्या तळाशी जाऊन गुन्हेगारांना हुडकून काढावी अशा प्रकारची मागणी केली. दरम्यान कापण्यात आलेली सागवानी झाडे मोठय़ा किमतीची असून एकूण पाच झाडे कापली असून यामध्ये जवळपास वीस ओंडके असल्यामुळे त्याची बाजारपेठ किंमत जवळपास तीन लाखांच्या आसपास असण्याची शक्मयता आहे.