ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयकर विभागाने 1 एप्रिल 2020 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 1.87 कोटींहून अधिक करदात्यांना 1,91,105 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 1,84,45,638 प्रकरणांमध्ये 67,334 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा जारी केला. 2,14,935 प्रकरणांमध्ये 1,23,680 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा दिला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वावलंबी भारत योजना जाहीर केल्यापासून परताव्याची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले होते. त्यानुसार ही प्रक्रिया पार पडत आहे. यंदा कोणालाही आयकर विभागाकडे परताव्याची विनंती करावी लागली नाही. सर्व करदात्यांनी ताबडतोब ईमेलला प्रतिसाद द्यावा. जेणेकरून ज्यांना परतावा मिळू शकला नाही, त्यांनाही तो मिळू शकेल, असे सीबीडीटीने म्हटले आहे.