प्रतिनिधी / करमाळा
सरपंचपदापासून ते आमदार होईपर्यंत करमाळा तालुक्यातील पत्रकारांनी मला जी मदत केली त्यामुळे मी करमाळा तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे आणू शकलो. असे स्पष्ट मत शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे शंभूराजे फरतडे, नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, सूर्यकांत पाटील , जेऊरचे माजी सरपंच राजुशेठ गादिया, माजी सरपंच भास्कर कांडेकर, युवा नेते नागेश झांजुर्णे ,उपसभापती दत्ता सरडे , शिवसेनेचे युवा नेते देवानंद बागल आदी जन उपस्थित होते.
यावेळी पत्रकार नासीर कबीर, प्राध्यापक अशोक नरसाळे, अण्णा काळे, अश्पाक सय्यद, नागेश चेंडगे, संजय मस्कर, धर्मराज दळवी,जयंत दळवी, दिनेश मडके, तुषार घोलप, सचिन जवेरी, अविनाश कदम, अतुल बोकन ,अलीम शेख आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना नारायण पाटील पुढे म्हणाले की 2014 सालच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई असताना सर्व पत्रकारांनी माझी सत्याची बाजू जनतेपुढे मांडली त्यामुळेच मला जनतेने निवडून दिले. कोणताही राजकीय घरात वारसा नसताना आर्थिक पाठबळ नसताना मला जे यश मिळाले आहे त्यात पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की नारायण पाटील यांच्या काळात विकासाची गंगा करमाळा तालुक्यात आली ती कौतुकास्पद आहे. आज नारायण पाटील आमदार नसले तरी जनतेच्या मनात तेच आमदार असून शासन दरबारातून तालुक्याच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी नारायण पाटील कुठे कमी पडणार नाहीत. पत्रकारांनीही ही या मागील काळात ज्या पद्धतीने शिवसेनेला व नारायण पाटलांना प्रसिद्धी दिली त्याच पद्धतीने भावी काळात प्रसिद्धी द्यावी वेळप्रसंगी नारायण पाटील यांच्या विकास कामाबाबत चुका झाल्या तीही बाजू आपण वृत्तपत्रातून प्रसिद्धीसाठी सांगितले.