ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कररचना जैसे थे ठेवण्यात आली. सलग सहा वर्ष कररचनेत कोणताही बदल न झाल्याने करदात्यांच्या पदरी निराशा आली आहे.
कररचनेतील स्लॅब बदलण्यात आले असले तरी देखील आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयकर रिटर्न संबंधी अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. करदात्यांकडून फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या करदात्यांवर पूर्ण विश्वास ठेवण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.