सत्ताधारी आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त झाल्या भावना
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी आघाडी चा विजय निश्चित आहे केवळ घोषणा बाकी आहे, त्या मुळे यंदा अध्यक्ष पदाचा पहिला मान करवीर तालुक्याला मिळाला पाहिजे अशी मागणी सत्ताधारी आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आली. स्वागताच्या भाषणातच गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी ही मागणी केली. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे रोख धरून त्यानी ही मागणी केली. त्यांच्या या मागणीचे करवीर च्या ठराव धारकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
मागील 5 वर्षातजेष्ठ असूनही आमदार पी. एन. पाटील यांना अध्यक्षपदा पासून दूर रहावे लागले ही खंत करवीरच्या
ठराव धारकांना आजही आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात ही भावना पुन्हा व्यक्त झाली आहे.