निवडणूक ग्रामपंचायतीची लढत मात्र आ. पी. एन. पाटील व माजी आ. चंद्रदीप नरके गटात होण्याचे चित्र
प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पाडळी खुर्द, कोगे, महे, गर्जन, चाफोडी, म्हालसवडे, पाटेकरवाडी आदी गावांमध्ये विधानसभा पेरणी व ग्रामपंचायत रणसंग्राम सुरू झालेला आहे. निवडणूक ग्रामपंचायतची असली तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये थेट लढत ही काँग्रेस आमदार पी. एन. पाटील व शिवसेना माजी आमदार चंद्रदीप नरके या गटातच होणार असे चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये उत्साहाने उमेदवार फॉर्म भरत असतात. पण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांमध्ये कोणकोणती कामे केलेली आहेत, याचा लेखाजोखा गावकऱ्यांचा समोर मांडणे महत्त्वाचे असते.
ग्रामपंचायत मधून प्रामुख्याने करावी लागणारी कामे
1. पाणी योजना
2. पिण्याच्या पाण्याची नळ योजना
3. गटारी दुरुस्ती नवीन गटारी करणे
4. मासिक मीटिंग घेणे
5. येणारा ने आधी त्याचा योग्य ठिकाणी विनियोग करणे गरजेचे
6. टेंडर देताना त्यांचे कौशल्य पहाणे महत्त्वाचे
7. स्मशान शेड गावातील खांबावरील वीज सुविधा देणे
8. गावातील मुख्य रस्ते व त्यांच्या समस्या सोडवणे
9. सांड पाणीप्रश्न सोडवणे.,
10. कचऱ्याची विल्हेवाट लावणे,
11. डांबरीकरण रस्ता फंड निधी महत्त्वाचा खेचून आणणे व गावाच्या विकासाला प्राधान्य देणे. इत्यादी अनेक कामे ग्रामपंचायत मध्ये निवडून गेल्यानंतर करायची असतात.
या सर्व मुख्य गरजा गेल्या पंचवार्षिक मधील उमेदवारांनी करणे व नवीन उमेदवारांनी समोर ध्येय ठेवणे गरजेचे असते. जुन्या उमेदवाराने या सर्व गरजा जर पूर्ण केल्या असती तर त्यांना निवडणुकीमध्ये ग्रामस्थांकडून नक्कीच फायदा होईल. वरील गरजा पूर्ण केल्या नसतील नवीन उमेदवारांना ग्रामस्थ पसंती देतील. एकंदरीतच या सर्व घडामोडीतून स्थानिक राजकारण हेही महत्त्वाचे असते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विधानसभेची पेरणी करणे म्हटले तर वावगे होणार नाही.