ऑनलाईन टीम / कराची :
कराचीतील स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्यासाठी भारत जबाबदार असल्याचे आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री मकदूम शाह महमूद कुरेशी यांनी केले आहेत. कोणत्याही पुराव्यांविना करण्यात आलेले हे आरोप भारताने फेटाळले आहेत.
दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 19 जण मारले गेले. पाक सैन्याने हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचाही खात्मा केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा दहशतवादी हल्ल्यानंतर निषेधाचे पत्रक लगेच जारी केले जाते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी पाकच्या आरोपांवर आक्षेप घेतला.
कोणत्याही पुराव्यांविना पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा विषय सुरक्षा परिषदेने हाताळू नये , असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनीच म्हटले आहे.