रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली, मंडईतील गाळे सात महिन्यांपासून बंदच
वार्ताहर/ कराड
देशासह राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कराड शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद आहे. अनलॉक सुरू झल्याने टप्प्या टप्प्याने सर्व मार्केट सुरू होत आहे. मात्र कराडची मुख्य भाजी मंडई कधी सुरू होणार असता प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य मंडई बंद असल्याने सर्व भाजी विक्रेते रसत्यावर बसत असल्याने रसत्यावरील गर्दी वाढली असून वाहतुकीस आडथळा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासुन कराड शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद आहे. या मार्केटमध्ये जवळपास 200 कट्टे असून यात सुमारे 196 भाजी विक्रेते बसतात. तर मार्केटच्या आतील बाजूस सुमारे 50 गाळे आहेत. लॉकडाऊनपासून पालिकेने मार्केटची इमारत बंद केल्याने आतील गाळे सुद्धा बंदच आहेत. मात्र मार्केटच्या बाहेरील बाजूस असलेले गाळे अनलॉकनंतर सुरू करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे कराडचे रविवार व गुरूवारी भरणारे दोन्ही आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र भाजीपाल अत्यावश्यक असल्याने गर्दी न करता शहरातील रस्त्यावर भाजी विक्री करण्यास पवानगी देण्यात आली होती. त्यानुसार मुख्य भाजीमंडईच्या परिसरासह, पांढरीचा मारूती मंदिर परिसर, उपजिल्हा रूग्णालय समोर, गुजर हॉस्पिटल परिसर, कमानी मारूती मंदिर परिसर आदी भागात भाजी विक्रेते बसत होते. मुख्य भाजी मंडई बंद असल्याने मंडईतील विक्रेतेही रस्त्यावरच बसू लागल्याने रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची गर्दी होत आहे.
राज्यात अनलॉक सुरू आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने मार्केट व अन्य उद्योग व्यवसाय सुरू हात असताना मुख्य भाजी मंडई मात्र अद्याप बंदच आहे. कोरानाच्या नियमाचे पालन करून मंडई सुरू केल्यास रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे. तसेच विक्रेते व ग्राहकांचे ऊन पावसापासून संरक्षण होणार आहे.