वार्ताहर/ कराड
कराड ते काठमांडू (नेपाळ) असा सायकल प्रवास पूर्ण करणाऱया रोटरी क्लब ऑफ कराडचे सदस्य विजय वरुडे, शिवाजी कणसे, अंबरीश जोशी, राजेंद्र अवळकर यांचा कराड येथे परतल्यानंतर दत्त चौक येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी सारंग पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, कराड रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, सचिव अभय पवार, प्रोजेक्ट चेअरमन जगदीश वाघ, असिस्टंट गव्हर्नर डॉ. राहुल फासे, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर प्रबोध पुरोहित, किरण जाधव व मान्यवर उपस्थित हेते.
या प्रवासादरम्यान सायकल रॅलीच्या माध्यमातून ‘इट ऑरगॅनिक’ या संदेशाची जनजागृती करण्यात आली. रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न करता जर सेंद्रिय अन्नधान्य उपयोगात आणले, तर आरोग्य उत्तमप्रकारे राहू शकते, हे पटवून देण्याचे कार्य रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आले.
याप्रसंगी राजेश खराटे, मिलिंद रैनाक, डॉ. शेखर कोगनुळकर, अभय नांगरे, राजीव खलिपे, अभिजित गोडसे, अजय भट्टड, आनंदा थोरात, रवींद्र देशमुख, राजेंद्र कुंडले, भद्रीनाथ धस्के, डॉ. भोकरे, अधिकराव पाटील, भारत जाधव, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शिवराय ट्रकिंग ग्रुप सदस्य, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.