साविआतल्या कुरघोडय़ा स्वच्छ करण्याचा अभाव
विशाल कदम/ सातारा
स्वच्छ भारत अभियानात सातारा शहर पहिल्या दहामध्ये आणायचे असा निर्धार फक्त विद्यमान मुख्याधिकारी अभिजित बापट हेच करू शकतात. गेल्या दोन वर्षात आरोग्य विभागात नेमके काय सुरू आहे याची विरोधकांपेक्षा सत्ताधारी नगरसेवकांना माहिती नसते.त्यामुळे नुकताच जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये कराड देशात अवल ठरू शकते पण सातारा शहर कुठे?,असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत एका साविआच्या नगरसेवकानेच स्वच्छ भारत अभियानाच्या माहितीची पुस्तिका कुठे अशी विचारणा केल्यानंतर पुस्तिका देण्यात आली होती.
सातारा शहर स्वच्छतेत नंबर वन आणायचे आहे असे कागदावर म्हणून रंगवून चालत नाही.तर प्रत्यक्ष काम स्वच्छतेचे झाले पाहिजे.यासाठी सत्ताधारी गटाकडे सकारात्मक दृष्टी आणि अधिकायांकडुन काम करवून घेण्याची धडपड असायला हवी.सातारा पालिकेत सत्ताधारी गटाचा अंकुश अधिकायांवर नव्हता.गेल्या दोन वर्षात आरोग्य विभागाचे सुरू असलेले कामकाज मिळालेल्या रँकिंगवरून दिसत आहे.सत्ताधायांमध्ये एकमेकांची जिरवाजीरवी सुरू असल्याचा फायदा अधिकायांनी घेतला होता. कोणाच पालिकेत व नेत्याकडे चालत त्यांचा एक गट व त्यानाच धरून अधिकारी असायचे.अगदी त्यांच्या घरी आणि एका हॉटेलमध्ये गोपनीय चर्चा झडत असायची.प्रत्यक्षात शहर स्वच्छतेच्या नावाने सगळीच बोंब सुरू होती.कच्रयात किती मिळेल याकडेच नजरा होत्या.स्वच्छ भारत अभियान हे एका दिवसात चालणारी प्रक्रिया नव्हती.सातत्य आणि कार्यवाही महत्वाची असते. येथे मात्र उलटेच झाले विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डात पिंक टॉयलेट रद्द करण्याची धडपड झाली.विरोधी नगरसेवकांनाच हे अभियान काय आहे याची माहिती नव्हती.गतवर्षी स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घोषित केली.काही नगरसेवकांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु बक्षीस नाही ना कौतुक त्यामुळे हे अभियान पुरते शहरात बारगळले.अर्थ संकल्पात तरतूद केली होती.तसेच पत्रकार, नागरिक यांचा ही पालिकेकडून सहभाग घेणे आवश्यक होते. तेथेही अधिकायांनी या अभियानाची दडवादडवी केली.पाहणीला पथक आले त्यावेळी पथकास खरे चित्र शहरातील दृष्टीस पडले. पाहणीपूरती सार्वजनिक शौचालय रंगवल्याचे पाहून नाराजी गुणातून दिसली.आरोग्य विभागात अधिकारी त्यावेळचे काय आताचे काय शहराच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न थिटे पडत आहेत.बायो मायनिंग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सकारात्मकता दिसून येत नाही.अगदी पालिकेत दिवाळे गुटखा खाऊन थुंकलेली दिसतात.टेरेसवर अस्वच्छता दिसते.तत्कालीन उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी थोडासा प्रयत्न केला होता.विरोधकांनी वारंवार स्वच्छ भारत अभियानाच्या खर्चावरून आणि माहिती देण्यावरून सत्ताधायांना विचारणा केली होती.ग्रास रुटला नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही दिसले नव्हते.त्यामुळे सातारा या स्पर्धेत कोसो दूर राहिला आहे.
सातारा ही येईल की नंबर वन
सातारा शहर हे कराड शहराच्या दृष्टय़ा मोठं आहे.त्यांचे निकष वेगळे आहेत आणि सातायाचे निकष वेगळे आहेत.एवढय़ा मोठय़ा शहरात मॅनेज करायचे म्हणलं की अवघड होतं.तरीही आमचे प्रयत्न सुरू होते.शहर स्वच्छ ठेवण्यात कोणतीही कसूर राहिली नव्हती.
सौ.माधवी कदम नगराध्यक्षा