प्रतिनिधी/ कराड
घातक कचरा असणाऱया ई कचऱयाच्या निर्मूलनासाठी कराड नगरपरिषदेने निर्धार केला असून त्यासाठी महालक्ष्मी ई रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत 5 वर्षासाठी करार केला आहे. पालिकेच्या घंटागाडीद्वारे आता ई कचरा गोळा केला जाणार आहे.
सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते. या युगात असणारी एक मोठी समस्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. हा कचरा कधीही न विघटन होणारा व घातक घटक असणारा असतो. हा कचरा म्हणजे पर्यावरणासाठी विषासमान मानला जातो. या कचऱयाच्या निर्मूलनासाठी कराड नगरपरिषदेने निश्चय केला असून त्यासाठी महालक्ष्मी ई रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत 5 वर्षासाठी करार केला आहे. संपूर्ण कराड शहरातील ई कचरा ही कंपनी घेणार असून त्याची शास्त्राrय पद्धतीने विल्हेवाट लावणार आहे. शिवाय या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यता देखील आहे. कराड नगरपरिषदेच्या या प्रयत्नामुळे कराड शहरातील घातक अशा ई कचऱयाचे योग्य प्रकारे निर्मूलन होऊन पर्यावरणाचा ऱहास थांबणार आहे. सर्व नागरिकांनी आपला ई कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये जमा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.