भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात ‘साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि धर्म संस्थापन करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतो.’ ज्याप्रमाणे राम अवतारामध्ये रावण कुंभकर्ण आदी राक्षसांचा संहार केला, कृष्ण अवतारामध्ये कंस जरासंध आदी राक्षसांचा संहार केला, नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा संहार केला, वराह अवतारामध्ये हिरण्यकक्षचा वध केला अशी अनेक उदाहरणे वेद पुराणामध्ये आहेत. असुरी वृत्ती म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाला आव्हान देणे आणि त्यांच्या भक्तांच्या मार्गामध्ये अडथळा आणणे आणि अशा प्रवृत्तीचा जेव्हा भगवंताला शरण गेलेल्या भक्तांना त्रास होतो तेव्हा भगवंत निरनिराळय़ा रूपामध्ये अवतीर्ण होतात व साधूंचे रक्षण आणि धर्माचे रक्षण म्हणजे भगवद भक्तीची पुनःस्थापना करतात. असे भगवान श्रीकृष्ण प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होण्यापूर्वीच त्याचे वर्णन वेदामध्ये आहे. आजकाल गल्लीबोळांमध्ये ‘भगवंत’ अवतीर्ण होत आहेत आणि अज्ञानी लोक अंधश्रद्धेने त्यांचे विनाकारण स्तोम वाजवत आहेत. म्हणूनच आध्यात्मिक मार्गावर असलेल्या प्रामाणिक व्यक्तीने अशा सामान्य माणसाला काही चमत्कार दाखवतो म्हणून अथवा भक्तांच्या मागण्या पूर्ण करतो म्हणून आणि अशा भौतिक कारणासाठी ‘भगवंत’ म्हणून स्वीकारू नये. श्रीमद् भागवतमध्ये भगवंत केव्हा व कशासाठी अवतीर्ण होतात याचे विस्तृत वर्णन दिलेले आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हे प्रथम समजून घेतले पाहिजे आणि ते केवळ त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेमधील उपदेशाचे पालन करून, त्यांनीच दिलेला भक्तिमार्ग दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्षात आचरणात आणून त्यांच्या भक्तांच्या संगतीमध्ये राहूनच शक्मय आहे. भगवद् गीतेच्या शेवटच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण निर्देश करतात ‘माझाच भक्त हो, मलाच नमस्कार कर, तू मला प्रिय आहेस म्हणून हे सत्य मी तुला सांगत आहे.’ हा सर्व युगातील धर्म मार्ग आहे.
क् ाढाही लोकांना असा प्रश्न पडतो की आज जगामध्ये इतक्मया समस्या आहेत, अराजक माजलेले आहे, सर्वत्र क्षेत्रात गोंधळ आणि भ्रष्टाचार वाढतो आहे, प्रामाणिक लोकांना केवळ जगणेही अशक्मयप्राय होऊन बसले आहे, मग अशावेळी भगवंत का अवतीर्ण होत नाहीत आणि अशा समस्या निर्माण करणाऱयांना का ठार करत नाहीत जसे त्यांनी पूर्वी अनेक अवतारांमध्ये केले.
प्रामाणिकपणे शास्त्राच्या आधारे सांगावयाचे झाल्यास पूर्वी असुरी वृत्तीच्या व्यक्तीची संख्या फारच कमी होती म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार धारण करून त्यांचा वध केला. आज प्रत्येकजण स्वार्थी वृत्तीमुळे भगवंताच्या उपदेशाचे पालन न करता केवळ इंद्रियतृप्तीसाठी जगत आहे, धर्माच्या नावाखाली सर्वत्र अधर्माचे पालन आणि प्रचार होतो आहे अशावेळी भगवंत किती जणांना ठार करणार? तसे केल्यास आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही. याच कारणासाठी आपल्या हृदयातील असुरी वृत्ती नष्ट करून भगवद् भक्तीचे बीज रोवण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णच आपल्या भक्ताच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झाले आणि कलियुगातील धर्म हरिनाम संकीर्तन याचा प्रचार केला आणि स्वतःच्या उदाहरणावरून भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करावी याचे उदाहरण सर्व जगापुढे ठेवले. श्रीमद्भागवतमध्ये सांगितले आहे, ‘कलियुग दोषांचा महासागर आहे पण केवळ भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करून आपण सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो हा एकमेव चांगला गुणही या युगामध्ये आहे.’ आणि याच युगधर्माचा प्रचार करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. श्रीमद् भागवतमध्ये याचेही वर्णन आहे ‘अव्याहतपणे कृष्णनामाचे कीर्तन करणाऱया भगवद् अवताराची आराधना करण्यासाठी कलियुगातील बुद्धिमान लोक सामूहिक कीर्तन करतात. या अवताराचा वर्ण घननीळा नसला तरी ते श्रीकृष्णच आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे पार्षद, सेवक, शस्त्रे आणि घनि÷ सहचरदेखील आहेत.’ याचप्रमाणे अनेक वैदिक शास्त्रामध्ये या विशेष अवताराचे वर्णन आहे.
भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम आणि चैतन्य महाप्रभूंना प्रेम पुरुषोत्तम म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने येऊन भक्तिरसाचे आस्वादन केले. तसेच त्यांनी कलियुगातील पतित, बद्ध जीवांच्या उद्धारासाठी दिव्य हरिनाम संकीर्तन आंदोलनाचा श्रीगणेशा केला. श्री चैतन्य महाप्रभु सध्या पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नादिया गावातील मायापूर या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमा शके 1404 (18 फेब्रुवारी 1486) या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रकट झाले. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच त्यानी हरिनाम संकीर्तनाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. पुढे 24 व्या वषी संन्यास घेऊन जगन्नाथपुरी येथे वास्तव्य केले. गौडीय वैष्णव परंपरेतील थोर आचार्यरूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंचे वर्णन करताना म्हणतात ‘भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना मी सादर वंदन करतो, ते भगवंताच्या अन्य कोणत्याही अवताराहून उदार आहेत. इतर कोणताही अवतार देऊ शकला नाही असे विशुद्ध कृष्णप्रेम ते मुक्तपणे प्रदान करीत आहेत’.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये केवळ उपदेश केला परंतु त्याचे व्यावहारिक जीवनात प्रत्यक्ष पालन कसे करायचे हे शिकवले नाही. श्रीकृष्ण हे ‘सुहृदं सर्वभूतानां’ म्हणजे प्रत्येक जीवाचे ते सुहृद, मित्र आहेत म्हणून द्वापार युगाच्या अंती आपल्या लीला संपुष्टात आणताना त्यांनी विचार केला ‘मी अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला गुह्यतम भगवद्गीतेचे ज्ञान प्रदान केले. परंतु या द्वापारयुगानंतर कलियुग येईल जे अतिशय पापी लोकांनी भरलेले असेल. अशा लोकांची पापवृत्ती जसजशी वृद्धिंगत होईल तशी त्यांची चेतनाही प्रदूषित होईल, मने कलुषित होतील, त्यांना भगवंताला पूर्णपणे शरण कसे जावे हे समजणार नाही, कारण मी प्रात्यक्षिक उदाहरण अजून प्रस्थापित केलेले नाही, या कारणास्तव मी
माझ्या भक्ताच्या रूपामध्ये भूतलावर पुन्हा अवतार घेईन.’ कलियुग हे चार युगामधील सर्वात भ्रष्ट असे युग आहे. या युगामधील लोक कलह आणि दंभ सहित अनेक दुर्गुणांनी ग्रासलेले आहेत. त्यांचे अंतःकरण केवळ स्वार्थ आणि
इंद्रिय लोलुपतेमध्ये गुंतलेले आहे आणि अशा अज्ञानी लोकांना मनुष्य जन्म हा भगवद् भक्ती प्राप्त करून सर्व दुःखातून मुक्त होणे या एकमेव कारणासाठी प्राप्त झाला आहे याची साधी कल्पनाही नाही. अशा पापी, दुराचारी लोकांना अगदी
ब्रम्हादि देवतांना दुर्लभ आणि हजारो वर्षे कठोर तपस्या करूनही प्राप्त न होणारे कृष्णप्रेम मुक्त हस्ते वितरित केले म्हणून भगवान चैतन्य महाप्रभु प्रेम पुरुषोत्तम, म्हणजे भगवद प्रेम वितरित करणारे करणारे करुणावतार म्हणून ओळखले जातात.
भगवान चैतन्य महाप्रभूंनी 525 वर्षांपूर्वी ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये केला एवढेच नाही तर संपूर्ण जगभरातील प्रत्येक शहर आणि गावामध्ये या हरिनाम संकीर्तनाचा प्रसार होईल अशी भविष्यवाणीदेखील केली. आज संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये लक्षावधी लोक या हरिनाम संकीर्तनामध्ये सहभागी होऊन सुखी, आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगत आहेत आणि अनेक लोक या हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करीत आहेत.
त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाने कृष्णउपदेश समजून घेऊन, त्याचे स्वतःच्या जीवनात पालन करून जगाच्या कल्याणासाठी त्याचा प्रचार करावा असे आवाहन चैतन्य महाप्रभूंनी सर्व भारतीयांना केले आहे.
400 वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनीही हीच प्रेरणा घेऊन नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।। असा उपदेश केला आहे. येत्या फाल्गुन पौर्णिमा रविवार दि. 28 मार्च रोजी भगवान चैतन्य महाप्रभूंचा अवतीर्ण दिवस आहे त्या निमित्याने त्यांची करुणा प्रत्येकाने समजून घ्यावी.
वृंदावनदास