तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत डॉ. दीपक आंबर्डेकर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : प्रतिनिधी
करोना म्हणजे नवीन रोग, या रोगावर कोणताच उपचार नसल्याने अशा जागतिक बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येक जण या रोगातून वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. या रोगामुळे प्रत्येकाच्या माणसातील माणुसकी संपल्याने, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. भारतात अल्पावधीतच 100 कोटी लोकांचे लसीकरण करून यावर मात केली असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी केले. ‘करोना-आरोग्यासाठी नविन आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.
अमृतमहोत्सवी ब्राम्हणसभा करवीर (मंगलधाम) कोल्हापूर व श्री महालक्ष्मी को.ऑप. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला-2021 चे पहीले पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात या 21 व्या व्याख्यानमालेस रविवारी प्रारंभ झाला. प्रारंभी तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले.
करोना हा नवा रोग चीनमधून भारतात केरळमध्ये एका महीलेमुळे आला. हा रोग कसला आहे ? यावर उपचार काय ? याबाबत जगातील वैद्यकीय क्षेत्र अनभिज्ञ होते. अशा परिस्थितीत डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक गैरसमज पसरल्याने डॉक्टरांच्यावर मोठा दबाव होता. करोना म्हणजे खग्रास ग्रहणासारखे चित्र लोकासमोर आले. पण कोविड 19 या नावाने हा रोग ओळखला जाऊ लागला. वटवाघूळाच्या लाळेमधून उंटाच्या लाळेतून हा रोग जगभरात पसरला. या रोगामुळे प्रत्येकाचे शारीरीक, मानसिक, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. यामुळे जनजीवन ठप्प झाले. या रोगामुळे माणसातील माणूसकी संपल्याने मृत्युप्रसंगी सुध्दा कोणतेच आप्तेष्ठ जवळ नाहीत हे सुध्दा दुर्दैव ठरले आहे.करोनामुळे नवनवीन शब्द लोकांना अनुभवायास मिळाले.
मास्क,सॅनेटायझर,सोशल डिस्टींगशन,लॉकडाऊन,अलगीकरण, वर्क फ्रॉम होम,ऑक्सीजन आदी लोकाना अनुभवायास मिळाली. पण या सर्वावर मात करतच भारताने नवनवीन लसी बाजारात आणल्या. भारताने अल्पावधीतच 100 कोटी लोकांना डोस देऊन एक उच्चांक करून, त्यावर मात केली असल्याचे डॉ. दीपक आंबेडकर यांनी सांगितले.स्वागत,प्रास्ताविक विनोद डिग्रजकर,नंदकुमार मराठे, परिचय ऍड. विवेक शुक्ल,आभार डॉ, उदय कुलकर्णी तर सूत्रसंचालन दिपक भागवत यांनी केले. व्याख्यानमालेस केदार तेंडुलकर, सुहास तेंडुलकर,अनुराधा तेंडुलकर,जयंत तेंडुलकर,रामचंद्र टोपकर,श्रीकांत लिमये,प्रशांत कासार कृष्णा काशिद, ऍड. राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते.