आज काल बऱयाच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात लक्ष्मी यात्रा साजरी केली जाते. तरी लक्ष्मी यात्रेनिमित्त आपले काही विचार आपल्यासमोर ठेवले आहेत. कारण यात्रा कोणतीही असो लक्ष्मी असो वा मंगाई… यात्रोत्सव साजरा करण्यामागे बराच उद्देश अथवा हेतू आहे. कारण कोणतीही यात्रा साजरी करणे म्हणजे आपले सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांना आमंत्रित करुन एकत्र आणणे, आपुलकीचे संबंध वाढविणे, गावापासून कामासाठी परगांवी राहिलेल्या आपल्या माणसांना एकत्रित करणे, नवे नातेसंबंध जुळवणे त्याचबरोबर सतत शेतीच्या कामात वाहून घेतलेला शेतकरी यात्रेनिमित्त विसावा घेतो व पै पाहुणे येणार म्हणून घराची थोडीफार रंगरंगोटी करतो. या सर्व कारणामुळे यात्रा आयोजित करणे म्हणजे वरदान आहे.
यात्रा कशी करावी ?
शक्यतो यात्रा एक दोन दिवसांची असावी. यात्रेवेळी शक्मय तितक्मया पै पाहुण्यांना बोलवावे. सर्वांनी मिळून गोड जेवण करुन नैवेद्य दाखवावा. ओटी भरून सर्वांनी मिळून आपल्या घरी गोड जेवण करुन आनंद लुटावा, यांच्यातून आपल्यामध्ये गोडवा वाढेल, आपुलकी निर्माण होईल, जेणेकरुन यात्रा वरदान ठरेल.
सध्याचे लक्ष्मी यात्रेचे स्वरुप पाहिले तर खर्चिक व सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये मराठा समाज व थोडाफार इतर समाज पण असतो. यात्रेची सुरूवात कशी होते ती पाहू…
गाव पातळीवर काही श्रीमंत, दुकानदार, सावकार, पुढारी अशी पंच मंडळी एकत्र येतात, यात्रेनिमित्त आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्याची संधी. दुकानदाराला व्यापारवृद्धी करण्याची संधी, सावकार किंवा दलाल यांना कर्जाऊ रक्कम देऊन आपला खिसा भरण्याची संधी, राजकारणी किंवा पुढारी यांना आपली जनशक्ती दाखविण्याची मुभा प्राप्त होते. तर या सर्वांपुढे आपले काही चालणार नाही, म्हणून सर्वसामान्य जनता या सर्व गोष्टीचा स्वीकार करते.
लक्ष्मी यात्रा कशी केली जाते?
लक्ष्मी यात्रा ही सर्वसाधारण बारा दिवस साजरी केली जाते. गावातून गावाबाहेर लक्ष्मी स्थानापन्न केली जाते. या कालावधीत सर्वांना मांसाहाराचे जेवण असते. गृहलक्ष्मीने फक्त स्वयंपाक करून पाहुण्यांचा पाहुणचार करणे, तर यजमानाने स्वागत करुन त्यांच्या जेवणाबरोबर इतर सरबराई ठेवणे. यामध्ये सर्वांबरोबर गरीब मात्र कर्जबाजारी होत असतो. बारा दिवसाचे कर्ज पुढील बारा वर्षे फेडण्यामध्ये गुंतून जातो. इतका लाखो रुपये खर्च करुन आपण यातून काहीच समाधान किंवा आनंद मिळवू शकत नाही. घरची सर्व प्रगती पैशाअभावी कुंठीत होते. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. भक्ती, श्रध्दा जरुर असावी, पण अंधश्रद्धा असू नये.
प्राचार्य-रमेश गणपतराव देसाई