ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसच्या कार्यकाळात कर्जबुडव्यांकडून एकही पैसा वसूल करण्यात आला नाही. याउलट मोदी सरकारने कर्जबुडव्यांकडून 10 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे.
लोकसभेत बोलताना सीतारामन म्हणाल्या, देशात प्रथमच थकबाकीदारांकडून वसुली झाली आहे. यूपीए सरकार वसुलीत अपयशी ठरल्याने एनपीएचा बोजा वाढला आहे. जाणीवपूर्वक कर्जफेड न करणाऱ्यांवर आणि बँकांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेसला हे कटू सत्य ऐकावं लागेल, कारण ही कर्जे काँग्रेसच्या राजवटीत केवळ राजकीय प्रभावाने देण्यात आली होती.
रिझर्व्ह बँकेकडून ॲप-आधारित वित्तीय कंपन्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणावरील कारवायांवरही सरकार लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण कर्जबुडव्यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर, एकूण 10 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकबाकीदारांकडून वसूल केली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.