शिरोळ / प्रतिनिधी
शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केली. वसंत राहू कांबळे वय 62 राहणार रमाई माता नगर सांगली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यांने साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत वसंत कांबळे या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज काढले होते. ते फेडायचे कसे या विवंचनेत होते. या नैराश्यातून आज (दि. २९) सकाळी नऊ वाजता धरणगुत्ती हद्दीतील गट नंबर 286 या शेतातील झाडास साडीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची सर्जेराव राहू कांबळे रा शिरोळ यांनी शिरोळ पोलिसात वर्दी दिली असून शिरोळ पोलिस अधिक तपास करत आहेत