बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात कोविड -१९ च्या कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास दीड लाखांपर्यंत वाढली आहे. कर्नाटक सरकारने गठित केलेल्या कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) रात्री कर्फ्यूची वेळ वाढवण्याची आणि “शनिवार व रविवार जनता कर्फ्यू” लावण्याची शिफारस केली आहे.
टीएसीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यपालांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले, चित्रपट व नाटक थिएटर, सभागृह, व्हिडिओ गेम पॉईंट्स, उद्याने, करमणूक उद्याने आणि आर्केड्स , व्हिडिओ गेम 31 मे पर्यंत बंद राहिला पाहिजे, असे म्हंटले आहे.
टीएसीने आधी नमूद केले होते की मे २०२१ च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा वेग वाढणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असण्याची शक्यता आहे.
दरम्यान सरकारने असे नमूद केले आहे की सरकारने सार्वजनिक ठिकाणी कठोरपणे बंदी घातली पाहिजे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम १४४ ची मे अखेरपर्यंत अंमलबजावणी करावी. समितीतील तज्ज्ञांनी असेही नमूद केले की, “सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आणि व्यवसायिक आस्थापने बंद राहिली पाहिजेत. तथापि, आवश्यक वस्तू आणि सेवा निश्चित वेळेत पुरविल्या पाहिजेत. ”
‘परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत’
या प्रक्रियेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन टीएसीने ३१ मेपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत अशी शिफारस केली आहे. “ऑनलाईन आणि डिस्टन्स एज्युकेशन मोडवर आधारित वर्ग सुरू ठेवून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात याव्यात.” असे म्हंटले आहे.