वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री . बी. सी. पाटील यांनी कणेरीमठा वरील लखपती शेती व गो शाळेला भेट दिली. बुधवारी दुपारी कृषी राज्यमंत्री बी.सी.पाटील कणेरीमठ येथे आले असता मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी त्यांचे स्वागत केले.यानंतर त्यांना मठावरील लखपती शेती, सेंद्रिय शेती, गोशाळा, म्युझियम ,गुरुकुल हे सर्व उपक्रम दाखवले. यावेळी सेंद्रिय शेती मधील उत्पादनाचे पिक मठाचे कृषी अधिकारी तानाजी निकम यांनी रानभाज्या या, याच शेतामध्ये पिकवले असून विविध प्रकारच्या रानभाज्या त्यांनी कृषिमंत्र्यांना दाखवल्या. शिवाय या सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या रान भाज्याना विक्रीसाठी सुद्धा ग्राहकांकडुन मोठी मागणी होत आहे. मठाच्या या उपक्रमामुळे बरेच लोक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. यामध्ये वेटलॉस होण्यासाठी असणारे पिक, गवती चहा अशी विविध प्रकारची औषधी वनस्पती आपण आपल्या शेतात हे पीक घेऊ शकतो असे निकम यांनी मंत्री पाटील यांना सांगितले.
कृषिमंत्र्यांनी लखपती शेतीची रचना पाहून त्यांनी मठाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शिवाय असे उपक्रम आपण आपल्या भागात नक्कीच राबवु असे ते यावेळी म्हणाले. यानंतर त्यांना स्वामीजींनी मठा वरील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम व मुलं करत असलेली प्रात्यक्षिके दाखवली. ही प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर मंत्री पाटील म्हणाले या गुरुकुल मध्ये विद्यार्थी पुढे जाऊन नक्कीच ऑलम्पिक मध्ये चमकतील. तर यातली विद्यार्थी कोणीही नोकरीत न जाता ही मुले पुढे जाऊन मोठे व्यापारी होऊन हजारो लोकांना रोजगार देतील. या मुलांची प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर असे उपक्रम राबवणारे हजारो मठ या भारत देशातल्या काणाकोपऱ्यात असायला हवेत अशा भावना त्यांनी यावेळी भाषणातून व्यक्त केली. यावेळी त्यांच्याबरोबर एग्रीकल्चर बेंगलोर चे डायरेक्टर श्रीनिवास, नंदिनी कुमारी, विजय पाटील ,मोकाशी आदींसह कणेरी गावातील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते .