बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सोमवारी आणखी सहा जिल्ह्यातील निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, जेथे हॉटेल, जिम आणि सार्वजनिक परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान राज्य सरकारने बळ्ळारी, बेंगळूर ग्रामीण, चित्रदुर्ग, शिवमोगा, उडुपी आणि विजापूर जिल्ह्यात कोविड निर्बंध शिथिल केले गेले कारण या जिल्ह्यातील कोरोना सकारात्मकतेचे सरासरी प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी लोकांनी काळजी घ्यावी आणि कोविड सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले. राज्य सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित शेतकरी समर्थक कार्यक्रम ‘रयत स्पंदना’ मध्ये भाग घेत ते म्हणाले की, सोमवारपासून राज्य सरकारने बहुतेक कोविड निर्बंध शिथिल केले, पण लोकांची समजूत आहे की त्यांनी यापूर्वीच कोरोना विषाणूचा पराभव केला आहे.
“लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत हे पाहून माझे मन खूप दु: खी झाले आहे … म्हणून मी विनवणी करतो की कोविड नियमांचे उल्लंघन करू नका आणि हा प्राणघातक विषाणू गेला आहे या भावनेत राहू नका. कोरोना अजून गेलेला नाही, अद्याप तो मोकळ्या ठिकाणी लपून बसलेला आहे. म्हणून, मास्क वापर, सामाजिक अंतर ठेवा आणि हात स्वच्छ धुवा, असे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून सांगितले, आहे.