बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ते दिल्लीदरम्यान पहिली ‘किसान रेल्वे’ १९ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान कर्नाटक येथून धावणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय रेल्वेमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशवंत दूध, मांस आणि मासे (राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी तयार करणारे) वाहतूक करण्यासाठी किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. किसान रेल ही एक अशी ट्रेन आहे ज्यात विविध वस्तूंची वाहतूक होते.
शनिवारी केएसआर बेंगळूरहून किसान रेल्वे १६.४५ वाजता सुटणार असून सोमवारी २३.४५ वाजता दिल्लीतील एच. निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल असा अंदाज आहे. किसन रेल बेंगळूर येथून पाच फेऱ्या करेल. पहिली रेल्वे १९-०९-२०२० रोजी आणि शेवटची सेवा १७-१०-२०२० रोजी होईल.
या निवेदनात म्हटले आहे की, केएसआर बेंगळूरहून हजरत निजामुद्दीनमार्गे म्हैसूर, हुबळी आणि पुणेमार्गे ही गाडी धावेल, जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त दरात शेतीमाल, विशेषत: स्वस्त वस्तूंच्या वितरीत करण्यात मदत होईल.