बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारनेही तपासणीची गतीही वाढविली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी राज्यात आजकाल ५० हजाराहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. राज्यात आतापर्यंत २५ लाखाहून अधिक जणांची तपासणी केली आहे.
राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३,००,४०६ इतकी आहे. यापैकी २,११,६८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २५,८८६ जलद प्रतिजैविक आणि ४१,१८० आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ६७,०६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात एका दिवसात कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण२५,८०,६२१ नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे.