बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दहा दिवस सकारात्मकतेचे प्रमाण कमी झाले होते. शुक्रवारी ११ व्या दिवशी पुन्हा सकारात्मकतेचे प्रमाण ३२ टक्क्यांहून अधिक झाले. तर राज्यात मृत्यूचे प्रमाण ०.९८ टक्के आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊनमुळे कोरोना साखळी तोडण्यास मदत होत होती. परंतु शुक्रवारी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली. गेल्या २४ तासात राज्यात कोविडचे ४१,७७९ रुग्ण आढळले, तर ३५,८७९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने घरी परतले.
राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१,३०,२६७ वर पोहोचली आहेत. तर यापैकी १५,१०,५५७ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे . राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ७०.९० टक्के आहे. राज्यात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या ५,९८,६०५ वर पोहोचली आहे. राज्यात कोविडमुळे एकूण २१,०८५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३७३ रुग्णांचा मृत्यू शुक्रवारी झाला आहे. राज्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह दर ३२.८६ टक्के होता. तर मृत्यूचे प्रमाण ०.८९. टक्के होते.
बेंगळूरमध्ये एका दिवसात ५० हून अधिक पोलीस कर्मचार्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे माजी माध्यम सल्लागार महादेव प्रसाद यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले.