बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातल्या अनेक भागात गेल्या कित्येक दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. पावसामुळे पिकांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसचे अनेक घरात पाणी शिरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठ्या धरणांतून पाणी सोडल्यामुळे अनेक जिल्ह्यात पाण्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी कर्नाटकला केंद्राकडून बचाव व मदत कार्यात सर्व ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे.
सर्वात जास्त पूर उत्तर कर्नाटकात आहे.गेल्या तीन महिन्यांत या भागात तिसर्या वेळी पूर आला आहे. हावेरी, कोप्पळ, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर, उदगीर, गदग, धारवाड, बागलकोट, विजापूर इत्यादी जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पावसामुळे भीमा नदीला पूर आल्याने गुलबर्गा आणि यादगीर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील बरीच गावे पाण्याखाली गेली आहेत आणि शेतातील उभे पिके नष्ट झाली आहेत. तर गोडाऊन आणि डाळी गिरण्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य खराब झाले आहे.