बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली. राज्यात ९७० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात ६५७ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या ९,४२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १२,१३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यात ४७९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर २४० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर दोन कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ५,८५९ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४,३४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.