बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन आणि विधान परिषदेच्या ४ जागांसाढी निवडणूक होत आहे. राज्यात पोटनिवडणूक लागल्याने सर्वच पक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागले आहेत. राज्यात या निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे पक्षांतर सुरु आहे. दरम्यान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी आरआरनगरमधील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था हवी आहे. जेडीएस चे माजी आमदार एम. एस. अक्की आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिगडल्याचे विधान केले.
.
शिवकुमार यांनी जेव्हा भाजपचे उमेदवार मुनिरत्न कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात आला होता. त्यामुळे आरआरनगरमध्ये शांतता होती. मुनिरत्न यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रदेशात समाजविरोधी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे लोक घाबरले आहेत. येथे कायदा व सुव्यवस्था अशी कोणतीही गोष्ट नाही असे ते म्हणाले.
मुनिरत्न बाहेरून लोक आणून अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत असा आरोप केला. पक्ष कार्यकर्त्यांवर रोज हल्ले होत आहेत. बुधवारी नंदिनी लेआऊट येथे भाजपा कार्यकर्त्यांनी एका कार्यकर्त्यावर हल्ला करून जखमी केले. पोलिसांनी प्रथम तक्रार दाखल करण्यास नकार दिला. यानंतर पोलीस ठाण्यासमोर जबरदस्तीने धरणे आंदोल केल्यानंतर पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास भाग पडले.
शिवकुमार यांनी या भागात शांततेत मतदान पार पडण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. तसेच निवडणूक आयोगाला निवडणुकीदरम्यान अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती दिलेल्या निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.