बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) कोरोना काळात बंद असलेली आंतरराज्य सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला असून शेजारच्या महाराष्ट्रातील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्याने केएसआरटीसी २२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा सेवा सुरू करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. दरम्यान बेंगळूर, दावणगिरी, मंगळूर आणि राज्यातील इतर भागांमधून महाराष्ट्रात जाण्यासाठी बसेसचे नियोजन केले गेले आहे.
याआधी, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील टप्प्या टप्प्याने सेवा सुरु करण्यात आली होती.