बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण असणाऱ्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीत सुधारित रणनीतीसंदर्भात स्पष्टीकरण देताना राज्यातील मंत्री आणि अधिकाऱयांच्या पथकाने, आम्ही मृत्यूची संख्या कमी करण्यावर भर देत आहोत. या शेवटी आम्ही चाचणीची संख्या वाढवली आहे, नमुने गोळा करणे आणि निकाल अपलोड करणे यामधील विलंब कमी झाला आणि घरून रुग्णालयात जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे म्हंटले.
मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण सी.एन. आणि उच्च सरकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक झाली.