म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते माझी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाल्याचे म्हंटले आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ६५ टक्के जागा जिंकल्याचा दावा केला. सिरा आणि राजाराजेश्वरी नगर मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी ग्रामसभेवर पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर झाला.
पक्षाच्या नेत्यांनी असा दावा केला की त्यांच्या प्रतिनिधींनी २४९ पंचायतमधील ३,६४४ जागांपैकी २,४१० जागा जिंकल्या आहेत. म्हैसूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बी.जे. विजयकुमार यांनी पक्षाने हंसूरमधील ५९६ पैकी ४०६, पेरियापटनातील ५४५ पैकी २९६, केआर नगरातील ५६० पैकी २८०, एच. डी. कोटे ५६७ पैकी ३०२, टी नरसिंपूरमध्ये ५१० पैकी २८३, चामुंडेश्वरीमध्ये ३४५ पैकी १७८ आणि नानजानगुडमधील ४७६ पैकी३१५ ठिकाणी विजय मिळविला आहे.
काँग्रेस नेत्यांनी चामराजनगरमध्ये २,१५९ सदस्यांपैकी १,१३५ हे १२९ पंचायतींचे प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे होते. परंतु भाजपनेही तळागाळातील निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याचा दावा केला आहे. चामराजनगर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पी. मेरीस्वामी यांनी त्यांनी चमारजनगर तालुक्यात २८०, गुंडलूपेटमध्ये २९०, कोल्लेगलमध्ये २९५ आणि हनूर तालुक्यात २७० जागा मिळवून १,१३५ जागा जिंकल्याचा दावा केला आहे.