बेंगळूर/प्रतिनिधी
उच्च न्यायालयाने लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश निवडणूक निवडणूक आयोगाला दिले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
पोटनिवडणूक आणि एमएलसी निवडणुकांनंतर शांत असलेले कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. आम्हाला आशा होती की पुढच्या वर्षीपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जातील. आता आम्हाला काम करण्यावाचून पर्याय नाही, असे एका वरिष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्याने म्हंटले आहे.
शुक्रवारी उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाला (एसईसी) तीन आठवड्यांत तारखा जाहीर करण्याचे निर्देश दिले. म्हणजे निवडणुका वर्षा अखेरीस होण्याची शक्यता आहे.