बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण अरबी समुद्रात १५ मेच्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. १४ मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी कर्नाटकच्या किनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळाच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशातील मच्छिमारांना सतर्क करण्याच्या उद्देशाने कार्यवाही सुरु केली आहे.
भातरतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या शेवटी दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज वर्तविला आहे. पूर्वेकडील अरबी समुद्रावर १६ ते २१ मे पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाच्या वादळामध्ये तीव्र होऊ शकते ज्याचे नाव टॉक्टाय असेल.
चक्रीवादळ टॉक्टाय (Tauktae) लक्षद्वीपच्या दक्षिणेस तयार होईल आणि केरळच्या किनारपट्टीजवळ येण्याचा अंदाज आहे. यामुळे १४ आणि १५ मे दरम्यान केरळ आणि कर्नाटका राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसांत चक्रीवादळ टाँकटाई अधिक तीव्र होईल, असा जागतिक अंदाज वर्तवित आहेत. काही हवामान मॉडेल्सनुसार ओमान किंवा पाकिस्तानच्या दिशेने हे वादळ प्रवास करणार आहे. युरोपियन एन्सेम्बल प्रिडिक्शन सिस्टमचा अंदाज आहे की हे चक्रीवादळ १७ मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.