बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे त्या रुग्णांचे चाचणी अहवाल वेळेवर मिळत नसल्याने उपचारांना वेळ होत आहे. राज्यात कोरोना घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर आता रॅपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी) ची संख्या वाढविणार असल्याचे कोविड टास्क फोरचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी सांगितले आहे. दरम्यान, जलदगती चाचण्या वाढविण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सर्व राज्यातील सल्लागाराच्या अनुषंगाने हे पुढे आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सने मंगळवारी अधिक रॅट किट खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.